
दोन कामगार ठार
पाण्याची टाकी कोसळून
दोन परप्रांतीय मजूर ठार
कुरुंदवाड, ता. ५ ः टाकळीवाडी येथील एका कारखान्यात पाण्याची टाकी कोसळून दोन परप्रांतीय कामगार ठार झाले. मंटूकुमार सिंह (वय २५, बिहार) व कुंदेश्वर मिश्र (३५, मध्य प्रदेश) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कारखान्यात पुण्यातील एका कंपनीच्या वतीने डिस्टिलरी प्लांटच्या लोखंडी टाक्या उभारण्याचे काम सुरू असताना मौज कंपनीचे इंजिनियर सुशांत व विकास यांनी व एस. एस. कंपनीचे मालक बाळासाहेब मोरे रा. कराड यांनी व त्यांचे सुपरवायझर गणेश महादेव कुंभार (खडकेवाडा ता. कागल) यांनी टाक्या उभा करताना कामगारांना धोका होऊ नये म्हणून उपाययोजना केली नव्हती. गुरुदत्त शुगर्स कारखान्यात टाकीत पाणी भरून टेस्टिंग सुरू असताना टाकीची पाईप तुटून मंटूकुमार सिंह व कुंदेश्वर मिश्र यांच्या अंगावर पडल्याने ते जागीच ठार झाले. अपघाताची वर्दी बबलू बच्चा लालसिंग याने दिली. याप्रकरणी मौज कंपनीचे इंजिनियर सुशांत व विकास, अशितोष शिवाजी सस्ते, नितीन लोहार, एस. एस. कंपनीचे मालक बाळासाहेब मोरे, गणेश महादेव कुंभार यांच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल अनिल चव्हाण करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01741 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..