
धोकादायक इमारती उतरवून घ्या.नोटीसा
कुरुंदवाडमधील धोकादायक
घरे उतरविण्यासाठी नोटिसा
कुरुंदवाड ः महापूर आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुन्या दगडाची, विटा, मातीची काही घरे जीर्ण झाली आहेत. काही इमारतींचा भाग धोकादायक बनला आहे. अशी धोकादायक घरे मिळकतधारकांनी उतरवून घ्यावीत, अन्यथा पालिका प्रशासन उतरवून घेणार असल्याच्या नोटिसा लागू केल्या आहेत.
शहरात आठ फुटांपेक्षा जादा महापुराचे पाणी आले होते. अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. अनेक वर्षांपूर्वीची जुन्या दगड-विटा-मातीची कौलारू घरे पाण्यात भिजल्याने धोकादायक झाली आहेत. नागरिक अशा धोकादायक घरातच वास्तव्य करत आहेत. त्यामुळे जीवितहानी, आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.
ही घरे उतरवून घ्यावीत तसेच घरांचा धोकादायक भाग उतरवून घ्यावा, अन्यथा पालिका प्रशासनातर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिला आहे. कुरुंदवाड शहरातील धोकादायक घरांचा सध्या सर्व्हे सुरू केला आहे. ४६ हून अधिक धोकादायक घरे व इमारती निदर्शनास आल्या आहेत. त्यांना या इमारती उतरवून घेण्याबाबत सांगितले आहे. अजून काही धोकादायक इमारतींत नागरिक वास्तव्य करत आहेत. त्यांना घरे सोडण्याचा इशारा दिल्याचे नगर अभियंता नितीश कदम यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Krw22b01755 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..