
मलकापूरच्या शाळी नदीचे पात्र बनले '' गटारगंगा ''
शाळी नदीचे पाणी दुर्गंधीयुक्त
मलकापूर ः काळपट, हिरवट पडलेले दुर्गंधीयुक्त पाणी, प्लास्टिक व इतर कचऱ्याचा नदीपात्रातला खच असे चित्र येथील शाळी नदीपात्राचे झाले आहे. प्रतिवर्षी ऐन उन्हाळ्यात हे चित्र ठरलेले असते; मात्र संबंधित प्रशासनाला याचे घेणे देणे नसल्याचे चित्र आहे.
येथील शाळी नदीला पालेश्वर लघु प्रकल्पातून स्वच्छ व मुबलक असा बारमाही पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या परिसरातील सुमारे तेरा गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे; मात्र हे पाणी उचत गावाहून मलकापूरच्या हद्दीत आल्यानंतर त्यात मलकापूर येथील गटारांचे मैलायुक्त सांडपाणी थेट मिसळते. मलकापूर कोपार्डेदरम्यानच्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात हे पाणी शेतीसाठी म्हणून अडवून ठेवले जाते. त्यामुळे प्रवाह थांबल्याने ते काळपट दुर्गंधीयुक्त बनते. बंधाऱ्यावरून जा-ये करताना नागरिकांना या दुर्गंधीचा खूप त्रास होत आहे. प्रदूषित झालेले हे पाणी काही दिवसांच्या अंतराने बंधाऱ्याखाली सोडले जाते. त्यामुळे बंधाऱ्याखालील कोपार्डे, येळाणे, सांबू, शिरगाव, शाहूवाडी या गावांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या पाणी प्रदूषणावर कायम स्वरूपाची उपाययोजना होण्याची गरज आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mlk22b01344 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..