जयशिवराय किसान संघटनेच्यावतीने आंदोलन

जयशिवराय किसान संघटनेच्यावतीने आंदोलन

जय शिवराय संघटनेतर्फे आज
पेठवडगावात अन्नत्याग आंदोलन

पेठवडगाव : जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने रविवारी (ता.१९) पेठवडगाव येथे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या निषेधार्थ अन्नत्याग उपोषण आंदोलन करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी निवेदनात म्हटले आहे. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण गावचे शेतकरी साहेबराव करपे यांनी शेती परवडत नाही म्हणून पत्नी, मुलांसह आत्महत्या केली. ती महाराष्ट्रातील पहिली आत्महत्या होती. त्यानंतर आतापर्यंत चार लाखांपर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या आजही सुरूच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी, समाजातील घटकांनासुद्धा याची जाणीव व्हावी, या उद्देशाने समाजातील सर्वच नागरिकांनी शेतकऱ्यांप्रती एक दिवस अन्नत्याग उपोषण करावे, असे आवाहन माने यांनी केले आहे. आंदोलनात १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांनी सहभागी व्हावे. समाजप्रबोधन व्हावे, या उद्देशाने पेठवडगाव येथील नगरपालिका चौकात रविवारी सर्वच संघटनांना व सर्वपक्षीयांना घेऊन एक दिवसाचे अन्नत्याग उपोषण करण्यात येणार आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापल्या तालुकास्तरावर अशा प्रकारचे अन्नत्याग आंदोलन करावे, असे आवाहनही केले आले. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत उपोषण करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com