
भुमी सुपोषणाचे सिद्धगिरीचे कार्य दिशादर्शक ; व्यंकय्या नायडू
02569
सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे कार्य आदर्शवत
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू; नवी दिल्लीत‘भूमी सुपोषण, संरक्षण जन अभियानाचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
उजळाईवाडी, ता. ३ ः ‘‘भूमी सुपोषण व मानवी आरोग्याचा घनिष्ठ संबंध असल्याने सर्वांनी भूमीचे सुपोषण व संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे सर्जनशील कार्य सर्वांसाठी आदर्शवत आहे,’’ असे गौरवोद्गगार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काढले. नवी दिल्ली येथे आयोजित ‘भूमी सुपोषण आणि संरक्षण जन अभियान’ कार्यक्रमात ते बोलत होते. अभियानांतर्गत प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत भूमी सुपोषण पुस्तकाचे प्रकाशन केले.
कणेरी येथील श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी भूमी सुपोषण व संरक्षणाचे महत्त्व व जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी करायच्या उपाययोजनांची माहिती दिली. भूमी सुपोषणासाठी देशी गायीचे महत्त्व सांगितले. केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देश पातळीवरील प्राकृतिक शेतीविषयी चाललेल्या कार्याची माहिती देत प्राकृतिक शेतीची गरज व प्राकृतिक शेती मालाच्या विक्रीसाठी केलेल्या उपाययोजना संदर्भात मार्गदर्शन केले.
अभियान १३ एप्रिल २०२१ पासून देशात विविध संस्थामार्फत राबविण्यात येत आहे. भूमी सुपोषण व संरक्षण अभियानांतर्गत श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र मार्फत अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन व शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीचे कार्य वरिष्ठ शास्त्रज्ञ व सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र सिंह, मृदा शास्त्रज्ञ राजेंद्र वावरे व कृषी विस्तार शास्त्रज्ञ सुनील कुमार यांच्या मार्फत केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक व्ही. भागय्याजी, नाबार्डचे चेअरमन जी. आर. चिंताला व अक्षय कृषी परिवाराचे अध्यक्ष मनोज सोळंकी आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Ujl22b01257 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..