जलयुक्त शिवार योजना राबविणार :  समरजीतसिंह घाटगे

जलयुक्त शिवार योजना राबविणार : समरजीतसिंह घाटगे

जलयुक्त शिवार पुन्हा प्रभावीपणे राबविणार ः समरजितसिंह
उत्तूर, ता. १९ ः युती शासनाच्या काळात परिणामकारकरित्या राबविलेली जलयुक्त शिवार योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली होती. शिंदे फडणवीस सरकारने ती नव्याने सुरु केली आहे.कागल मतदारसंघात ही जलयुक्त शिवार योजना पुन्हा प्रभावीपणे राबविणार आहे; असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. आर्दाळ ( ता आजरा )येथे ४९ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ व बांधकाम कामगारांना साहित्य  वाटप अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुपाली पाटील होत्या.
यावेळी अंगणवाडी इमारत बांधकाम दहा लाख,प्राथमिक शाळा दुरुस्ती सात लाख,दलित वस्ती सुधारणा सव्वा चार लाख,जनसुविधा सात लाख,पाणी पुरवठा योजना सोलर सिस्टीम साडे एकोणीस लाख व पथदिवे सोलर प्रकल्प सव्वा लाख अशा ४९ लाख रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ श्री. घाटगे यांच्या हस्ते झाला. ग्रामस्थांच्या वतीने विकास कामासाठी  निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री घाटगे यांचा सरपंच रूपाली पाटील व ग्रामस्थांच्या हस्ते नागरी सत्कार झाला. यावेळी जनार्दन निऊंगरे , शिवाजी गुरव,प्रताप पाटील,विठ्ठल उत्तूरकर,सुर्यकांत पाटील,शिवाजी जाधव  यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास सरपंच रूपाली पाटील, करंबळीचे सरपंच अनूप पाटील, संदीप गुरव, बाजीराव खोत, आतिषकुमार देसाई, उपसरपंच विद्याधर गुरव, विठ्ठल पोवार, आंबाजी तोरस्कर उपस्थित होते. रविंद्र पाटील यांनी स्वागत केले. संपतराव देसाई यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com