
४ पासून बंद
राधानगरी- दाजीपूर राज्यमार्ग
४ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद
राधानगरी ता. १ : आजपासून बंद होणारा राधानगरी- दाजीपूर पर्यंतचा राज्यमार्ग ठेकेदाराच्या तांत्रिक दिरंगाईमुळे चार दिवस लांबला आहे. आता हा राज्यमार्ग ४ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद होत आहे. दोन महिने म्हणजे ३१ मे पर्यंत या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे. कोल्हापूर, कोकण आणि कर्नाटकातून होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दोन महिन्याच्या काळात या रस्त्यावरील मोऱ्या, लहान पुलांची पुनर्बांधणी व डांबरीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. वाहतूक बंद करण्यासाठी रस्त्यादरम्यान वाहन चालकांच्या माहितीसाठी प्रमुख ठिकाणी दिशाचिन्हे आणि माहिती फलक लावण्यात आलेले नाहीत. पर्यायी मार्गाच्या प्रारंभाच्या ठिकाणी ठेकेदार कंपनीकडून वाहन चालकांना मार्गदर्शनासाठी सुरक्षारक्षक तैनात नाहीत. यामुळे मुदत वाढल्याचे समजते.