कुकडीचे पाणी शेवटपर्यंत कधी पोचणार? 

Solapur
Solapur

सोलापूर : प्रशासनाचे दुर्लक्ष आणि पाण्याचे राजकारण यामुळे सिना नदी काठची सोलापूरसह अहमदनगर व उस्मानाबाद जिल्ह्यातील गावे कायम दुष्काळी राहिली आहेत. सिना भिमा जोड कालवा हा अशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प मानला जात असला तरी यापासून सीने काठची उत्तर भागातील गावे वंचित आहेत. या भागातील पाणी प्रश्‍न सुटावा म्हणून कुकडी प्रकल्पात पाच टीएमसी पाणी राखीव असल्याचे सांगितले जात आहे. पण ते शेवटपर्यंत पोचलेलेच नाही. ते पाणी आल्याशीवाय हा भाग सुजलमसुफलम होणार नाही. 

पुणे जिल्ह्यातील कुकडी नदीवर येडगाव व माणिकडोह ही धरणे बांधली आहेत. मीना नदीवरील वडज धरण, आर नदीवरील पिंपळगाव जोगे धरण व घोड नदीवरील डिंभे धरण ही सर्व धरणे त्यांचे कालवे इतर पाटबंधारे व बस्ती- सावरगाव येथील एक पिकअप वियर यांनी मिळून 37 टीएमसीचा हा कुकडी प्रकल्प बनला आहे. यातून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्‍यासाठी पाणी राखीव ठेवले जात आहे. मात्र टेल टु हेड (पुच्छ ते शीर्ष) या निकषाप्रमाणे म्हणजे शेवटपर्यंत अद्याप हे पाणी आलेलेच नाही. गेल्यावर्षी या प्रकल्पातील कामांना सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 

असे येणार पाणी 
कर्जत तालुक्‍यात सिना नदीवरील निमगाव गांगर्डी धरणात कालव्याद्‌वारे चोंडी येथे सिना नदीच्या बंधाऱ्यात कालव्याद्‌वारे त्याचा फायदा करमाळा तालुक्‍यातील मांगी व कामोणे गावांना दरवर्षी 15 आक्‍टोबरला उपलब्ध पाणी साठ्यावरून कालवा सल्लागार समिती पाणी सोडण्याचे नियोजन करते. त्यानुसार कालवा पाणी सोडले जाते. पाणी कुठे नेहीचे आणि सोडायचे याचे अधिकार महामंडाळाला आहेत. पाण्याच्या मागणीनुसार तिथे पाणी जाऊ शकते की नाही, धरणात तेवढे पाणी आहे की, तांत्रिकदृष्ट्या पाणी मागणी केलेल्या ठिकाणी पोचेल का व ते लाभक्षेत्रात आहे काय याचा विचार पाणी देण्यासाठी केला जातो. 
- स्वप्नील काळे, अभियंता, कुकडी प्रकल्प 

भिमेतून पाणी द्या; अन्यथा आंदोलन 
कुकडी प्रकल्पातील पाणी पूर्ण क्षमतेने येत नाही. ओव्हरफ्लोचे पाणी कधी तरी येते. करमाळ्यासाठी साडेपाच टीएमसी पाणी राखीव आहे. त्यातून 63 हजार एकर जमीन ओलीताखाली येऊ शकते. अंतर जास्त असल्याने वरून पाणी सोडले तर शेतकऱ्यांच्या जमीनीत ते आले नाही. यात अधिकारी, ठेकेदार यांचाच फायदा झाला आहे. त्यामुळे हे पाणी भिमा नदीत सोडून आमच्या हक्काचे पाणी द्या. ते बोगद्यातून उचलून कुकडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या गावात द्या. त्यामुळे कुकडीचे पुर्ण क्षमतेने पाणी मिळेल. आतापर्यंत हे पाणी फक्त मृगजळ ठरले आहे नाही तर पुढेही ते मृगजळच ठरणार आहे. डिंभे, वडज व घोड नदीतून हे पाणी भिमेत येऊ शकते. टाटाच्या येणाऱ्या पाण्याचाही सर्व्हे सुरू आहे. त्यातून मराठवाड्याला पाणी जाणार आहे. त्यातून करमाळा तालुक्‍यासाठी राखीव पाणी ठेवावे, अन्यथा आंदोलन करू, असे आमदार नारायण पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कुकडी प्रकल्पाची क्षमता - 37 टीएमसी 
उपयुक्त क्षमता - 31 टीएमसी 
वाया जाणारे पाणी- 7 टीएमसी 
एकुण सिंचन क्षेत्र - 1 लाख 32 हजार 278 हेक्‍टर 
प्रत्यक्षात सिंचन क्षेत्र - 1 लाख 32 हजार 566 हेक्‍टर 
एकुण कालवे - 9 
लांबी - 623 किमी 
डावा कालवा - 249 किमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com