अक्कलकोट : कर्नाटक शासनाच्या कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कडून महाराष्ट्रातील कन्नड माध्यमात शिक्षण घेऊन दहावी व बारावीला आपापल्या प्रशालेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त दहावीच्या २५८ व बारावीचे ५८ असे एकूण ३२६ विद्यार्थ्यांच्या सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक १२ हजार, द्वितीय क्रमांक ११ हजार, तृतीय क्रमांक १० हजार देऊन कन्नड प्राधिकार बेंगळुरू अध्यक्ष प्रा. एस. जी. सिद्धरामय्या व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंधेरी पश्चिम आमदार अमित साटम हे होते.
यावेळी डॉ. नल्लूरू प्रसाद आर के, मुंबई विद्यापीठ कन्नड विभाग प्रमुख डॉ. जी एन उपाध्याय, रत्नाकर शेट्टी, प्रकाश भंडारी, अशोक सुवर्णा, पी यु दिनेश, कृष्णकुमार बंगेर, बी आर मंजुनाथ, डॉ. पूर्णिमा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आहे. हा कार्यक्रम रविवार (ता. ६) एमव्हिएम श्रीमती शालिनी जी शंकर कंव्हेंशन सेन्टर अंधेरी पश्चिम मुंबई येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवमोग्याचे दीपिका आणि विजयपूरचे बसवंत आणि रमेश यांनी बहारदार जनपद गीतांनी कार्यक्रमाची मेजवानी देऊन रंगत आणली.या समारंभाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कन्नड अभिवृद्धी प्राधिकारचे सचिव के. मुरळीधर यांनी केले.
यावेळी प्राधिकार अध्यक्ष सिद्धरामय्या म्हणाले की, ''या कार्यक्रमाचा जागतिकीकरणात कोणतीही भाषा राज्यांपुरते सीमित राहिले नाही, आपण जगात कुठेही राहू शकतो अशी संधी मिळाली आहे. पण त्यातून कन्नड पर्यटन आणि अभिवृद्धी होणे महत्वाचे आहे. सध्या कर्नाटक बाहेर तीन कोटी कन्नड नागरिक राहतात पण त्यांची उदयोगशीलता आणि पराकाष्ठा अतिशय सुंदर आणि चांगली आहे. त्यांचे कन्नड प्रेम आणि जागृती प्रचंड आहे. कर्नाटक राज्यात कन्नड भाषा वितळते आहे. पण ते महाराष्टात बहरते आहे हे महत्वाचे आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कन्नड माध्यम विद्यार्थी प्रतिभा ओळखून त्यांना प्रोत्साहित करणे व त्यांच्यात सौहार्दयाचे वातावरण निर्माण करणे हा आहे. तसेच यावेळी बोलताना आमदार अमित साटम म्हणाले की, एवढे भाषा आणि धर्म असतानाही आपण सर्व जण एक आहोत आणि त्यामुळे आपण सर्व जणांची एकी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. मुंबई देशातल्या सर्वांना एकीने सामावून घेते आणि महाराष्ट्र सर्वांना दिलदारपणाची वागणूक देते आणि याचे मन खूप मोठे आहे. कारण येथे येणाऱ्या सर्वांना आपले मानणारा आहे. कर्नाटक सरकार जी शिष्यवृत्ती देते ते शिक्षणासाठी देते ते एक चांगले व्यक्ती बनविण्यासाठी आहे. जे काम करतो ते शंभर टक्के द्या आणि आपले जे मन सांगते तेच करा आणि त्यालाच आपले जीववनमार्ग बनवा.''
महाराष्ट्राप्रमाणेच तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ व गोवा आदी राज्यातील कन्नड माध्यम विद्यार्थ्यांचा असाच सन्मान सोहळा दरवर्षी असा घेतला जातो. मागील सात वर्षात दहावी व बारावीच्या एकूण २२८४ विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त कन्नड विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन यु आर राजेश अधीक्षक कन्नड अभिवृद्धी प्राधिकार,बी व्ही हरीश, एम महादेव, सौम्या आणि सर्व कन्नड अभिवृद्धी प्राधिकार कर्मचारी बेंगळुरू आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोनू स्वामी आणि चित्रतारके प्रतिभा गौडा यांनी केले तर आभार डॉ. के मुरळीधर यांनी मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.