Vidhan Sabha 2019 : आमची शेतकऱ्यांशी बांधिलकी कायम - ठाकरे

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

विधानसभा 2019 : इस्लामपूर - मला शहरीबाबू म्हणणाऱ्यांना शेतातलं खूप काही कळतंय; पण त्याचा कळण्याचा शेतकऱ्यांना काही उपयोगच नसेल तर त्यांचं शेतीच ज्ञान काय चाटायचं का? मला शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसतात ते पुसण्यासाठी माझा सतत प्रयत्न असतो. सत्ता असो वा नसो, माझी बांधिलकी शेतकऱ्यांशी आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली. 

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्या प्रचारार्थ यल्लमा चौकातील सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले, ‘‘खत किती टाकायचं? एफआरपी म्हणजे काय? हे खरंच मला कळत नाही. आणि ते कळून घ्यायची गरजही मला वाटत नाही; मात्र,  मला शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू दिसतात. ते पुसण्यासाठी माझा सदैव प्रयत्न असतो. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, मात्र मला त्याला कर्जमुक्त करायचं आहे. त्यांच्या बॅंक खात्यात दरवर्षी दहा हजार रुपये  द्यायचे आहेत. हा आमचा वचननामा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com