ससाणेंच्या निधनामुळे संवेदनशील लोकसेवक हरपला! - विखे पाटील

Radhakrishna-Vikhe-Patil
Radhakrishna-Vikhe-Patil

लोणी (नगर) : अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार जयंत ससाणे यांच्या निधनामुळे एक सजग, संवेदनशील व सक्रिय लोकसेवक हरपल्याचे विधानसभेतील विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

ससाणे यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर आम्ही एकत्रितपणे काम करीत होतो. जिल्ह्याच्या प्रश्नांसाठी लढताना त्यांचे पाठबळ कायम माझ्यासोबत राहिले. श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आणि श्रीरामपूरचे आमदार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी उत्तम होती. ते एक उत्कृष्ट संघटक होते. नियोजन कौशल्याचे धनी होते. त्यामुळेच ते दीर्घ काळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले व पक्षासाठी भरीव कामगिरी केली.

जयंत ससाणे हे माझे निकटचे सहकारी व वैयक्तिक मित्र देखील होते. त्यांच्या निधनामुळे विखे पाटील कुटुंबाचा एक सदस्यच हरपला आहे. दिलदार व कायम हसतमुख चेहऱ्याचे हे व्यक्तीमत्व कदापीही विस्मरणात जाऊ शकणार नाही. विधीमंडळ काँग्रेस पक्ष आणि प्रवरा परिवार ससाणे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com