लोकसभेला भाजप शिवसेनेला सोबत घेईल असे वाटत नाही: आठवले

Ramdas Athwale
Ramdas Athwale

सांगली : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष शिवसेनेला सोबत घेईल, असे वाटत नाही. परंतु, भाजपसोबत रिपलब्लिकन पार्टी नक्की उभी राहील आणि त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही तीसहून अधिक जागा जिंकू, असे भाकीत रिपाईचे नेते, केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले. 

गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची मते वाढतील, मात्र भाजपला गेल्यावेळेपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाजही त्यांनी वर्तवला. पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी कॉंग्रेसच्या नादाला न लागता सत्ताधारी भाजपशी चर्चा केली पाहिजे. त्यासाठी मी मध्यस्थी करायला तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर गुजरातपेक्षा महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेत मध्यस्थीची जास्त गरज आहे असे वाटत नाही का, या प्रश्‍नावर श्री. आठवले यांनी लोकसभेचे गणित मांडले. ते म्हणाले, ""राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची दाट शक्‍यता आहे. अशावेळी 2019 च्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजप, शिवसेना आणि रिपाई एकत्र राहणे अत्यंत गरजेचे आहे. परंतू, भाजप शिवसेनेला सोबत घेईल, असे वाटत नाही. रिपाई मात्र त्यांच्यासोबत असेल आणि आमची ताकद असल्याने एकत्रित 30 पेक्षा जास्त जागा जिंकू.'' 

ते म्हणाले, ""नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात झालेल्या कामांमुळे 2019 ला पुन्हा हेच सरकार येणार आहे. राहूल गांधी यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांना फारमोठे यश मिळणार नाही. गुजरातमध्येही सध्या व्यापाऱ्यांचे भाजपने सोडवले आहेत. जीएसटीत बदल केले आहेत. तेथे 182 जागांवर आम्ही भाजपला पाठींबा दिला आहे, मी स्वतः प्रचाराला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मला बोलावले आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com