अडत बंद झाल्याने अडीच हजार कोटींची बचत

Solapur-Market-Committee
Solapur-Market-Committee

सोलापूर - बाजार समित्यांमध्ये अडतीच्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची लूट थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने 5 जुलै 2016 रोजी घेतला. त्यामुळे मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांची तब्बल दोन हजार 388 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहारांवर शेतकऱ्यांना दोन टक्‍क्‍यांची अडत द्यावी लागत होती. जुलै 2016 पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना बाजार समित्यांना तब्बल 11 हजार कोटी रुपये अडत म्हणून द्यावे लागले होते. अडत मुक्‍तीमुळे दरवर्षी सरासरी शेतकऱ्यांची बाराशे कोटी रुपयांची बचत झाली. बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांची लूट पूर्णपणे थांबल्याचा दावा राज्याचा पणन विभागाने केला आहे. अडत बंद असूनही शेतकऱ्यांकडून अडत घेणाऱ्या बाजार समित्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

शेतमाल तारणचा शेतकऱ्यांना लाभ
शेतमालांचे दर घसरल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण योजना सुरू केली. 2016-17 मध्ये चार हजार 842 तर 2017-18 मध्ये पाच हजार 484 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेंतर्गत 90 कोटी 11 लाख रुपयांचे तारण कर्ज देण्यात आले आहे. मागील वर्षी सुपारी व वाघ्या घेवड्याचा समावेश या योजनेत केला आहे. आता प्रायोगिक तत्त्वावर गुळाचा समावेश केल्याची माहिती राज्याच्या पणन विभागाकडून मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com