#SataraFlood कुटुंबांचे स्थलांतर युद्धपातळीवर सुरु

#SataraFlood कुटुंबांचे स्थलांतर युद्धपातळीवर सुरु

सातारा : दोन आठवड्याच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रमुख नद्यांना आलेल्या पुराचे पाणी गावात घुसल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सात तालुक्यातील 1316  कुटुंबातील 5640 सदस्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुराचा सर्वाधिक फटका कर्‍हाड, पाटण तालुक्याला बसला आहे. आतापर्यंत कर्‍हाड तालुक्यातील 909 , पाटणमधील 269, सातार्‍यातील नऊ, जावलीतील 33, वाईतील 50, महाबळेश्‍वर 29, फलटण तालुक्यातल 17, अशा एकुण 1316 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरीकांना सुरक्षितस्थळी आणण्यासाठी एनडीआरएफची टीम प्रयत्न करीत आहेत.
जिल्हा प्रशासनाने पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी सर्वपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. पुराच्या पाण्यात अडकणार्‍या नागरीकांना सुरक्षितस्थळी आणण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 5640 लोकांचे स्थलांतर झाले आहे.

प्रमुख धरणातील पाणीसाठा
 सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा टी.एम.सी.मध्ये असा.
धोम-10.14, धोम-बलकवडी-3.46, कण्हेर-8.48, उरमोडी-8.99, तारळी-5.15, निरा देवघर-11.27, भाटघर-22.86, वीर-8.60.                                                   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com