सरकारकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार

सरकारकडून सत्तेचा गैरवापर : शरद पवार

माढा (जिल्हा-सोलापूर) : सध्याचे सरकार ‌सत्तेचा गैरवापर करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा तालुक्यातील निमगाव (टे) येथे पत्रकारांशी बोलताना गुरुवारी (ता.21) केला. 

पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, की नाशिक येथील शेतकऱ्यांच्या मोर्चाला शासनाकडून अडवले जात आहे. त्यांची अडचण केली जात आहे. मोर्चा गुंडाळायला सांगितले जातेय, हा ‌सत्तेचा गैरवापर सध्याचे सरकार करत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या हालचालीबाबत पवार म्हणाले, की आरक्षणाचा निर्णय केला तर चांगला आहे. पण महाराष्ट्राची विधानसभा बोलवून ठराव करायचा अन् केंद्रात पाठवायचा. धनगर समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आदिवासी असल्याचे प्रत्यक्ष प्रमाणपत्र जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत बाकीच्या गोष्टीला काही अर्थ नाही.

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र होण्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. वंचित बहुजन आघाडीबरोबरच्या चर्चा सुरू असल्याने भाष्य करणे योग्य नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा जागा वाटपाबाबत प्रश्न संपला असून, डॉ. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर मित्रपक्षांबरोबर चर्चा सुरू आहेत. मनसेचा दृष्टीकोन एका विषयापुरता मर्यादित असल्याचे ते म्हणाले.

बहुजन वंचित आघाडीने आरएसएसबाबत स्पष्ट भूमिका घेण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितल्याबाबत विचारले असता आरएसएसच्या विचारशैलीला आमचा विरोधच आहे. आम्ही त्यांचे कधीही समर्थन करणार नाही. पुलवामा येथील हल्ला हा देशावरील हल्ला आहे. हल्ल्यानंतर सर्व पक्ष सैन्याचे मनोबल वाढण्यासाठी  सरकारसोबत आहोत. मात्र, सर्जिकल स्ट्राइक व जवानांच्या योगदानाचा राजकीय फायदा घेण्याचा भाजप सरकारने प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com