कागलचे मतदान मतपत्रिकेद्वारेच घ्यावे - मुश्रीफ

कागलचे मतदान मतपत्रिकेद्वारेच घ्यावे - मुश्रीफ

कोल्हापूर - ‘इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्राचे काय व्हायचे ते होऊ दे; पण कागल विधानसभेचे मतदान  मतपत्रिकेद्वारेच घ्यावे. तशी मागणी सरकारकडे करणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. विधानसभेला सरकारला ठोकल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. 

कागल विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्री. मुश्रीफ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. 

ते म्हणाले, ‘या सरकारचे कौतुक करावे लागेल, कारण त्यांनी राज्य कसे चालवायचे याचा धडा आता आम्हाला दिला आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जे घडले नाही, ते या सरकारकडून घडवले जात आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्‍न बाजूला पडत आहेत; पण त्याचवेळी नको ते प्रश्‍न पुढे केले जात आहेत. दुसऱ्या पक्षातील वजनदार नेत्यांना फोडायचे आणि स्वतःचा पक्ष बलवान करण्याच स्वप्न भाजपचे नेते बघत आहेत. परंतु, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनताच या सरकारला चोख उत्तर देईल.’

लोकसभेच्या निकालानंतर इलेक्‍ट्रॉनिक यंत्राविषयी उलटसुलट चर्चा होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘इलेक्‍ट्रॉनिक यंत्राचे काय व्हायचे ते होऊ दे; पण कागल विधानसभा निवडणुकीचे मतदान हे मतपत्रिकेद्वारेच होईल.’
जिल्हा बॅंकेचे संचालक भैया माने म्हणाले, ‘जिल्ह्यातील अनेक प्रश्‍न प्रलंबित असताना पालकमंत्री पाटील हे मात्र काजवा, रॉकेट आणि फुग्यातच गुंतून पडले आहेत. आजचे आंदोलन हे पाणी प्रश्‍नासाठी आहे. हा प्रश्‍न सोडवला नाही तर प्रसंगी कायदा हातात घेऊ, वेळ पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातही घुसू.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com