कोल्हापूर : कोल्हापूरला पुराचा वेढा असताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पूरपरिस्थिती पाहण्यासाठी कोल्हापुरात फिरकलेच नाहीत, असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी आज केला. आज मोर्चा काढणार म्हटल्यानंतर कर्जमाफीचा जिआरमध्ये बदल केला आहे. मात्र पूर्व अनुभव पाहता जोपर्यंत जाहीर केलेल्या घोषणाची खर्या अर्थाने अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत यांच्यावरती किंवा या सरकार वरती विश्वास ठेवता येणार नाही. असाही टोला आमदार पाटील यांनी दिला. पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरातील दसरा चौक येथून आमदार सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले राज्य शासनाने कर्जमाफीचा फार्स केला आहे. पूर्वीची कर्जमाफी अजुनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे शेतकऱ्यांची यामध्ये खूप मोठी दिशाभूल झाली आहे. ज्यावेळी कोल्हापूरला पुराने वेढा घातला होता त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर पाहिला असता तर पुराचे रौद्र रूप त्यांना पाहता आले असते मात्र पुराच्या वेळी ते दोन दिवस कोल्हापुरात फिरकलेच नाही अशीही टीका पाटील यांनी केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.