सोलापूर - राज्यात रखडलेले सिंचन प्रकल्प, फसवी कर्जमाफी, डबघाईकडे चाललेला सहकार, वाढलेली बेरोजगारी, जीएसटीमुळे झालेले व्यापाऱ्यांचे नुकसान, बंद पडत असलेला वस्त्रोद्योग यासह अन्य मुद्यांवर लक्ष केंद्रित करत कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोलापुरात "जनसंघर्ष यात्रे'च्या निमित्ताने मोदी सरकारचे अक्षरश: पिस काढले.
मागील चार वर्षांच्या काळात देशातील एकही घटक समाधानी नाही. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, बुलेट ट्रेन, सातबारा कोरा, शेतीमालाला हमीभाव, आरक्षण, रोजगार निर्मिती, उद्योगात वाढ अशा विविध घोषणा अद्यापही कागदावरच आहेत. साम-दाम-दंडच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा डाव भाजपकडून आखला जात असल्याचा आरोप या वेळी कॉंग्रेसकडून करण्यात आला. या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.
|