कदम कुटुंब काँग्रेस कधीही सोडणार नाही

कदम कुटुंब काँग्रेस कधीही सोडणार नाही

कडेगाव -  भाजप प्रवेशाच्या कितीही वावड्या उठवल्या तरी कदम कुटुंब कधीही काँग्रेस सोडणार नाही. आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहोत, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार मोहनराव कदम यांनी सोनहिरा कारखाना कार्यस्थळावर पत्रकारांशी बोलताना केला. 

ते म्हणाले,‘‘कदम कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. पक्षाने आजवर अनेक पदे दिली. त्या जोरावरच माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी पलूस-कडेगावसह जिल्ह्यात विकास कामांचा डोंगर उभा केला. पाणी योजना कार्यान्वित करून दुष्काळी भागाचे नंदनवन केले. साहेब शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्ये राहिले. काँग्रेस सोडण्याचा कुटुंबातील कोणी विचारही करु शकत नाही. आमच्या रक्तात काँग्रेस आहे.’’

ते म्हणाले, ‘‘लोकांचा उद्रेक मतपेटीत दिसला नाही. त्यामुळे मतदान यंत्राबाबत शंका उपस्थित होत आहेत. देशभरात मतपत्रिकेद्‌वारे मतदान घेण्याची मागणी होत आहे. लोकांच्या मागणीचा विचार करुन निवडणूक आयोगाने मतपत्रिकेद्‌वारे निवडणूक प्रक्रिया राबवावी.’’

ते म्हणाले,‘‘सोनहिरा कार्यस्थळावर माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे स्मारक उभारले जात आहे. ऑगस्ट अखेर वा सप्टेंबर पहिल्या पंधरावड्यात दरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह केंद्र व राज्यातील सर्व काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत स्मारकाचे उद्‌घाटन केले जाणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com