मोहोळ - राज्यातील विविध कालवे, तलाव या शासकीय पाणी स्त्रोतातून पाणी वापरासाठी घेताना ते मीटर प्रमाणे पैसे देवूनच घ्यावे लागणार आहे. पाटबंधारे विभागामार्फत आता विद्युत मोटारीच्या डिलिव्हरी पाईपलाच पाणी मापक यंत्र बसविले जाणार असून त्याचे पैसे ही शेतकऱ्यांनाच भरावे लागणार असून तसा शासनाचा अध्यादेश प्राप्त झाला असल्याची माहिती भीमा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता एस. एस. पासले यांनी दिली.
सध्या पाणी वापराबाबत शासनासह सर्वच स्तरातून प्रबोधन केले जात आहे. शेतकऱ्यांना शासनाने ठिबक सिंचनाचा वापर अनिवार्य केला आहे. तर ठिबक सिंचन असल्याशिवाय उसासारख्या पिकाच्या नोंदी ही साखर कारखाने घेत नाहीत शेतीसाठी आजही ग्रामीण भागात पाण्याचा पाटाचा वापर होतो. पाणी ज्यादा दिल्याने जमिनी नापिक होवू लागल्या आहेत. त्या क्षारपडही होत आहेत. नदीकाठच्या ठिकाणी आजही घातक अशी डुबुक पद्धतीचा वापर केला जात आहे.
या सर्वांवर बंधन यावे पाणी वापर काट कसरीने व्हावा, यासाठी आता मोटारीच्या डिलिव्हरी पाइपलाच पाणी मापक यंत्र बसविण्यात येणार आहेत. त्याची आकारणी घन मिटर पद्धतीने होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी दहा हजार रुपयांचा डीडी शासनाच्या नावे काढावयाचा आहे. पाणी मापक यंत्र पद्धतही इंग्रजांपासूनच असून शेतकऱ्यांच्या जीवनात हा टर्निंग पॉइंट असल्याचे पासले यांनी सांगितले. उन्हाळी हंगामापासूनच याची अंमल बजावणी करण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाच्या तुंगत विभागाने त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना तशा प्रकारच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे आता भविष्यात पाणी फुकट मिळणार तर नाहीच पण त्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे हे तितकेच खरे.
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.