दलाल, व्यापारी यांना जगवणारे हे भ्रष्टाचारी सरकार

दलाल, व्यापारी यांना जगवणारे हे भ्रष्टाचारी सरकार

नवेखेड - दलाल, व्यापारी यांना जगवणारे हे भ्रष्टाचारी सरकार आहे. हे सरकार जोपर्यंत शेतकर्‍यांच्या पिकाला हमी भावाप्रमाणे दर देणार नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

नवेखेड येथील व्यायाम शाळा व विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यावेळी उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, बोल घेवडया सरकारला पाच वर्षांनी लक्षात आले की शेतातील उत्पादित उत्पन्नात शेतकरी स्वतःचा उदर निर्वाह ही करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी शेतकर्‍यांला प्रतिवर्षी दोन हजाराचे गाजर दाखवले आहे. निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन गारज दाखवण्याचा हा प्रकार आहे. 

ते म्हणाले साखर सम्राटांच्या भूल थापा व त्यांच्या मनमानी कारभाराला भिक घालू नका. उसाचा दर हा हमी भावाप्रमाणेनेच घ्यायचा आहे. साखरेचा उठाव नाही, खरेदीदार नाही असे सांगणाऱ्या सरकार व साखर सम्राट यांना असे आमचे सांगणे आहे की आमच्याकडे खरेदीदार व्यापारी आहेत. ते तीन हजार रुपये भावाने एक लाख क्विंटल साखर खरेदी करतील.  दुसरे ही व्यापारी अशाच दराने खरेदी करतील. पण सरकार व कारखानदार ते देत का नाहीत असा सवाल शेट्टी यांनी केला 

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ती वेळ देखील पश्चिम महाराष्ट्रावर यायला वेळ लागणार नाही. कारण आश्वासनाची खैरात करणाऱ्या सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्नांची जानच उरली नाही.

- रविकांत तुपकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com