शेतीच्या पाण्यासाठी लढा देणे माझा मुख्य अजेंडा : शैला ताई गोडसे

शेतीच्या पाण्यासाठी लढा देणे माझा मुख्य अजेंडा : शैला ताई गोडसे

सलगर बुद्रूक - शेतीच्या पाण्यासाठी शासन दरबारी लढा देने हा माझ्या राजकारणातील कामाचा मुख्य भाग असून प्रसंगी राजकारण विरहित पाणीप्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे मत शैला गोडसे यांनी व्यक्त केले. लवंगी ता मंगळवेढा येथील भैरवनाथ शुगरवर कारखान्याचे अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. 

दरम्यान गेल्या कांही दिवसापासून दक्षिण मंगळवेढ्यातील म्हैसाळ टप्प्यातील पाणी प्रश्नावरून आवाज उठवणाऱ्या भूमिकेबद्दल त्यांना पत्रकारांनी छेडले असता त्या बोलत होत्या. त्या पुढे बोलताना म्हणाल्या की म्हैसाळ योजनेत दक्षिण मंगळवेढ्यातील आधी १३ गावांचा समावेश होता. त्यानंतर तानाजी सावंत व माझ्या प्रयत्नामुळे या योजनेत आणखी सहा गावांचा समावेश झाला.ही बाब माझ्या जीवनातील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून माझे तिकीट निश्चित आहे. जरी युतीच्या जागावाटपात मला तिकीट नाही मिळाले तरी पक्ष श्रेष्ठीच्या आदेशाने काम करत राहणार आहे. 

दरम्यान पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून आपण पाणी प्रशनाचे राजकारण करत आहात या बहुपक्षीय लोक प्रतिनिधींच्या टिके बद्दल विचारले असता गोडसे म्हणाल्या की माझ्यावर आक्षेप घेण्यापेक्षा त्यांनी स्वताच्या कामाचे आत्मचिंतन करावे.मी पाणी प्रश्ना बद्दल राजकारण करत नसून काम करत आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com