'देशातील शहरांची नावे हिंदू प्रेरक ठेवा'

'देशातील शहरांची नावे हिंदू प्रेरक ठेवा'

सातारा -  देशात  सर्वत्र हिंदूप्रेरक शहरांची नावे पुन्हा ठेवायला हवीत. समर्थ सेवा मंडळाच्या वेदांचे रक्षण करणाऱ्या अशा उपक्रमांमुळे वेदांचा प्रचार व प्रसार होत आहे. त्यामुळे निश्‍चितच समर्थ रामदास स्वामींना प्रेरित भारत देश साकारेल,’’ असे प्रतिपादन ज्योतिषपीठाधीश्वर शंकराचार्य  स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी केले.

सज्जनगडावर श्री समर्थ सेवा मंडळाने आयोजित केलेल्या चतुर्वेद पारायण सोहळा व ऋग्वेद स्वाहाकार सोहळ्याच्या उद्‌घाटनप्रसंगी वासुदेवानंद सरस्वती बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह  भारती होते. या वेळी सामवेदाचार्य राममूर्ती श्रौती शृंगेरी, पंडित प्रवर गणेशशास्त्री द्रविड, वेदमूर्ती राजेश्वरशास्त्री जोशी, प्रकाशशास्त्री दंडगे, शांताराम भानोसे, पळसकर गुरुजी, दिनकर जोशी, रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त प्रसाद स्वामी उपस्थित होते.

राजेश्वर शास्त्री म्हणाले, ‘‘सज्जनगडावर श्री समर्थ रामदास स्वामींनी उपासना महत्त्वपूर्ण रीतीने केली आहे. भक्ती सर्वश्रेष्ठ कशी आहे, हे समर्थ रामदासांनी पटवून दिले. प्रत्यक्ष अनुमानाने जे  कळत नाही, ते वेदातून कळत  आहे. पण, सज्जनगडावर कर्म  आणि भक्ती या कार्यक्रमातून दिसत आहे.’’

स्वामी विद्यानृसिंह भारती म्हणाले,‘‘संप्रदाय हे शंकराचार्याच्या शाखा आहेत. ज्ञानेश्वर माउली का मोठे झाले? कारण त्यांना कळलं ते कुठं थांबायचंय हे. आयुष्य जगताना कुठे थांबायचे, हे कळलं पाहिजे. इथे आल्यावर समर्थांचे दास म्हणवून घ्या.’’ 

डॉ. गुरुनाथ कोटणीस यांनी प्रास्ताविक केले. योगेशबुवा रामदासी, रमेशबुवा शेंबेकर, अभ्यंकरबुवा रामदासी, अमोद ताम्हणकर यांनी स्वागत केले. अजेयबुवा रामदासी यांनी परिचय करून दिला. मकरंदबुवा रामदासी यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com