राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंनाच राखीव कोटा

Admission
Admission

जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावरील जिल्ह्यातील ५२९ खेळाडूंना यंदा दरवाजे बंद
सातारा - जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ५२९ खेळाडू विद्यार्थ्यांना यंदा अकरावी प्रवेशाच्या राखीव जागांवरील दरवाजे बंद झाले आहेत. 

शासनाच्या नव्या निकषानुसार जिल्ह्यातील केवळ १३ खेळाडू विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरत आहेत.  राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी खेळाडू विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. जिल्ह्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो. तसेच इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांनी राज्य ते आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत सहभाग अथवा प्रवीण्य मिळविले असल्यास त्यांना सवलतीचे वाढीव (ग्रेस) गुण दिले जातात. ग्रेस गुणांबाबत शासनाने २० डिसेंबर २०१८ कालावधीत फेररचना केली. जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडू विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीनुसार पाच गुणांपासून २५ गुणांपर्यंत वाढीव गुण देण्याचे निश्‍चित केले. याबाबतचा अध्यादेश काढण्यात आला. यामध्ये अकरावी प्रवेशाकरिता खेळाडूंकरिता निश्‍चित करण्यात आलेल्या राखीव जागा (कोटा) केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू विद्यार्थी व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील पदक विजेते खेळाडू विद्यार्थी यांच्याकरिताच उपलब्ध राहील.

अन्य खेळाडू विद्यार्थ्यांना केवळ गुणांची सवलत दिली जाईल, असा नियम करण्यात आला. त्यामुळे यापूर्वीच्या तरतुदी रद्द झाल्यामुळे यंदा जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूंना अकरावीच्या प्रवेशासाठीचे दार बंद झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com