..मग मुख्यमंत्री काय फक्त गाजरंच खाणार का?

..मग मुख्यमंत्री काय फक्त गाजरंच खाणार का?

सोलापूर : केंद्राचे पथक येणार ते पाहणी करणार मग दुष्काळ जाहीर करणार आणि त्यांनंतर दुष्काळाच्या उपाय योजना होणार? तुम्ही मुख्यमंत्री आहात ना...तुम्हाला अधिकार आहे ना.... का तुम्ही फक्त गाजरंच खात बसणार अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी टीका केली. 

सोलापूरचा दौरा करून गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त भाजपच्याच लोकप्रतिनधींसोबत बैठका घेतल्या. इतर पक्षाच्या आमदारांना व लोकप्रतिनिधींना त्यांनी बैठकीला बोलविले नाही. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचा अवमान केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केला. 

मुख्यमंत्र्यांचा दौरा होत असल्याने जिल्ह्याचे लक्ष या दौऱ्याकडे लागले होते. या दौऱ्यातून दुष्काळी जनतेला ठोस काही तरी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु या दौऱ्याने जिल्ह्याची पुरती निराशा झाली आहे. दुष्काळाबाबत फक्त अधिकाऱ्यांशीच बोलायचे होते तर मग मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मुंबईत बोलावून बैठक घेतली असती तरीही चालले असते. उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्‍याची स्थिती बिकट असतानाही या दोन्ही तालुक्‍यांना दुष्काळी तालुक्‍यांच्या यादीतून वगळले आहे. भाजप सरकारच्या काळात शेतकरी व दूध व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या उद्‌ध्वस्त झाल्याचेही जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष बळिराम साठे उपस्थित होते. 

तर दिवाळीची पहिली अंघोळ अधिकाऱ्यांच्या घरासमोर 
ऑक्‍टोंबर अखेरपर्यंत टंचाईच्या उपाय योजना लागू करा अन्यथा आमची जनावरे तालुका व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या घरासमोर बांधली जातील. दिवाळीची पहिली अंघोळ अधिकाऱ्यांच्या घरासमोर करून दुष्काळी उपाय योजनांची मागणी सरकारपुढे मांडली जाईल असा इशाराही जिल्हाध्यक्ष साळुंखे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com