सोलापूर : चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल, यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
संबंधित मार्गावरील रेल्वेगाडी सुटण्याच्या 20 मिनिटे अगोदर प्रवाशांना स्थानकात सोडण्यात येणार आहे. राज्यातील सोलापूरसह नागपूर, पुणे, मुंबई यासह अन्य महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा यामध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.
खासगी वाहतुकीचे दर वाढल्याने आणि प्रवास आरामदायी नसल्याने बहुतांश प्रवाशांचा कल आता रेल्वेकडे वाढल्याचे पाहायला मिळते. उन्हाळा असो की हिवाळा, पावसाळा रेल्वे प्रवाशांची गर्दी अद्यापही कमी झाली नाही. दिवसेंदिवस त्यामध्ये भरच पडत असल्याचे दिसून येते. परंतु, काही वेळा अनावश्यक गर्दी अथवा काही अफवांमुळे प्रवाशांची धावपळ होते आणि चेंगराचेंगरीचे प्रकार घडण्याची शक्यता असते. अशा घटनांवर नियंत्रण आणण्याकरिता आता रेल्वे बोर्डाकडून ठोस आराखडा तयार केला जात असल्याची माहिती खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी दिली.
सोलापूर स्थानकाची स्थिती -
ठळक बाबी...
- ऍड. शरद बनसोडे, खासदार
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.