मंगळवेढा पाणी प्रश्नावरून राजकीय रणकंदन होण्याची शक्यता

मंगळवेढा पाणी प्रश्नावरून राजकीय रणकंदन होण्याची शक्यता

मंगळवेढा : तालुक्यातील 35 गाव पाणी प्रश्नावर गंडवा गंडवीची योजना म्हणून टर उडविणारे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीच या योजनेचे पाणी मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची भुमिका विधानसभेच्या निवडणूकीला एक वर्षाचा अवधी असतानाच केल्यामुळे या योजनेवरून जनतेची चार वर्षे गंडवा गंडवी केल्याचे उघड होऊ लागले. त्यामुळे पाणी न येताच निवडणुकीपुर्वी राजकीय रणकंदन होणार असल्याची चिन्हे दिसू लागले.

मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांपैकी 24 गावांची उपसा सिंचन योजना उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहे तर अकरा गावची पाणीपुरवठा योजना ही  म्हैसाळ च्या पाण्यावर अवलंबून आहे. हा पाणीप्रश्न गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असताना मागील सरकारच्या काळात आमदार भारत भालके  2014 साली या उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता पाठपुरावा करून घेतली. यात तालुक्यातील 24 गावांमधील 11 हजार 800 शे 20 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून त्यासाठी तत्कालीन सरकारने 530 कोटी रुपयांच्या प्रशासकीय आराखड्यास मान्यता दिली.पण निधीची तरतूद न केल्याने स्व. जयसिंग निकम व अन्य सहकाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावल्यानंतर शासनाने अखेर प्रतिज्ञापत्र सादर केले.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी उपलब्ध असलेल्या 54.71 द,ल,घ,मी  (2 टी एम सी ) पाण्यापैकी फक्त 28.66 दलघमी(1 टी एम सी ) एवढेच पाणी उपलब्ध होत असल्याचा अहवाल राज्य सरकारला कळवला. 27 जून 2018  रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी 28. 66  दलघमी ( 1 टीएमसी) ट) पाणी विचारात घेऊन या प्रकल्पाची आवश्यक ती फेररचना करून नव्याने सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी असा धोरणात्मक निर्णय घेतल्याने या योजनेचे नव्याने फेरसर्वेक्षण करणे आणि अंदाजपत्रक बनविण्याचे काम सुरू आहे. नव्याने सर्वेक्षण अंदाजपत्रक तयार करत असताना कमी झालेले 1 टी एम सी पाण्यामुळे  तालुक्यातील 24 गावच्या उपसा सिंचन योजनेतील कोणत्या गावातील कोणत्या शेतकऱ्यांना या कमी झालेल्या पाण्याचा फटका बसणार हा प्रश्न अधांतरीत आहे यामुळे या गावातील लाभार्थीमधून खळबळ उडाली आहे

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील 1 टीएमसी पाणी कुणाच्या चुकीमुळे कमी झाले हे शोधत बसण्यापेक्षा कमी झालेले पाणी कसे उपलब्ध  करता येईल यावर प्रशासनाने जास्त विचार करावा अशी मागणी करून त्यासाठी त्यांनी तीन पर्याय ही प्रशासनासमोर ठेवले असून या योजनेतील कोणतेही गाव कोणताही शेतकरी वगळला जाणार नाही याची खबरदारी घ्यावी अन्यथा आ तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 24 गावच्या शेतकऱ्यांचा तीव्र लढा उभारण्यात येईल.

- शैला गोडसे, जि.प.सदस्य

आघाडी सरकारच्या काही चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांच्या या चांगल्या योजनेची वाट लागल्याचे सांगत कमी झालेले पाणी उपलब्द करण्यासाठी आपण संमधीत अधिकारी यांची बैठक लाऊ.. तर हीच बैठक मंत्रालयात न घेता  गरज पडल्यास मंगळवेढ्यात 24 गावातील प्रतिनिधीसह घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- आमदार तानाजी सावंत

आघाडी सरकारने मंजूर केलेल्या 35 गावांची मंगळवेढा उपसा सिंचन योजना फसवाफसवी असल्याचे सांगून दुष्काळी तालुक्यातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळणाऱ्या  नाठाळ राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या सरकारने निधी देण्यास टाळाटाळ केली आहे  तसेच यापूर्वी 2 टीएमसी पाणी मंजूर केले असताना विद्यमान सरकारनेच एक टीएमसी पाणी कमी करण्याचे पाप असून गोडसेंनी या कामी ढवळाढवळ न करता पहिल्या कामाचे श्रेय नाठाळ मंत्र्याचे फोटो टाकून घेऊ नये.

- निर्मला काकडे, याचिकाकर्ते व माजी सभापती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com