ऊस तोड कामगारांचे स्थलांतर रोखा 

SUGARCANE EMPLOYEE.jpg
SUGARCANE EMPLOYEE.jpg

सांगली- "कोरोना' संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सीमा रोखल्या असून प्रवासी व माल वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे ऊसतोड कामगार स्थलांतर करणार नाहीत यासाठी कडक उपाययोजना कराव्यात असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. तसेच या कामगारांना जीवनावश्‍यक वस्तू आणि आवश्‍यक सेवा देण्याच्या उपाययोजना साखर कारखान्यांनी कराव्यात असे निर्देशही डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. 

सांगली जिल्ह्यात "कोरोना' बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा भागातून प्रवासी किंवा माल वाहतूक रोखण्यात आली आहे. अत्यावश्‍यक परिस्थितीत जिल्ह्याबाहेर जायचे असेल तर पोलिसांची लेखी परवानगी आवश्‍यक केली आहे. जिल्ह्यात "कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहेत. 

सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. "कोरोना' च्या भितीने ऊसतोड मजूर गावांकडे परतू लागले आहेत. ऊसतोड मजूर थांबत नसल्यामुळे काहींनी हंगाम आटोपता घेतला आहे. ऊसतोड मजूर जिल्ह्या बाहेरून तसेच राज्याबाहेरून देखील आले आहेत. ते घराकडे परतण्यासाठी वेगवेगळ्या वाहनातून जात आहेत. काही ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले आहेत.

सध्या जिल्ह्याची सीमा रोखण्यात आली आहे. त्यामुळे ऊसतोड मजूर स्थलांतर करणार नाहीत यासाठी कडक उपाय योजना कराव्यात. याबाबत कोणतीही तक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी दिले आहेत. ऊस तोड मजुरांच्या निवासाची सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी सोय करावी. तसेच त्यांना जीवनावश्‍यक वस्तू व अत्यावश्‍यक सेवा पुरवल्या जाव्यात अशा सूचनाही डॉ. चौधरी यांनी दिल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com