उंडवडीत टंचाई आढावा बैठक संपन्न

undavadi
undavadi

उंडवडी - "बारामतीच्या जिरायती भागात यंदा पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. टंचाईवर मार्ग काढण्यासाठी जो पर्यंत आपण सर्वजण एकत्र येत नाही, तो पर्यंत पुढील नियोजन होवू शकत नाही. त्यामुळे सर्वांनी दुष्काळावर आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी एकत्र यावे. " असे आवाहन बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी उंडवडी कडेपठार येथे केले. 

उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथे अधिकारी, पदधिकारी व शेतकऱ्यांची टंचाई निवारण व टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तहसीलदार श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषेदेचे सदस्य भरत खैरे, बारामती पंचायत समितीच्या उपसभापती शारदा खराडे, तहसीलदार हनुमंत पाटील, गटविकास अधिकारी प्रमोद काळे, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता बाळासाहेब सानप, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, आप्पासाहेब आटोळे, सरपंच विशाल कोकरे, उपसरपंच बाळासाहेब जराड यांच्यासह परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

तहसीलदार श्री. पाटील म्हणाले, " टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाणी लवकरात लवकर सोडण्यात येईल.  लाभार्थी गावातील ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विहिरी अवलंबून असलेल्या पाझर तलावात पाण्याचे आवर्तन सोडण्यात येईल. एखाद्या गावात शेतकऱ्याच्या विहिरीला किंवा बोअरवेल्सला जास्तीचे पाणी आहे. त्यांनी स्वताहून यावेळी लोकांना पिण्यासाठी पाणी द्यावे. जर तसे नाहीच घडले. तर शेवटीचा मार्ग म्हणून 

आम्ही ती विहीर किंवा बोअरवेल्स अधिग्रहण करू व ते लोकांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून देवू.

या बैठकीत गटविकास अधिकारी प्रमोद काळे म्हणाले, '' दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने तालुक्याचा 18 कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. यमध्ये ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत असतील तेथे विंधन विहिरी, बोअरवेल्स मारणे, विहिरीतील गाळ काढणे, विहिरीत आडवे बोअर मारणे, तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना सुरु करणे आदी कामांचा आराखडा संबधीत गावांच्या विचाराने झालेला आहे. यामध्ये आणखी पुरवणी आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये अजून कोणतेही महत्वाच काम सुचविण्याचे असल्यास तातडीने सूचवावे. म्हणजे ते काम टंचाई आराखड्यात घेवून तातडीने करणे शक्य होईल. सद्या तालुक्यात दहा टॅंकर सुरु असून अजून तीन टॅंकरकरची मागणी आहे. दिवसेंदिवस टॅंकरची मागणी वाढत आहे. '' 

यावेळी परिसरातील गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी या बैठकीत अधिकाऱ्याकडे जनावरांचा चारा आणि शिरसाई योजनेच्या पाणी तातडीने मिळावे, अशी मागणी केली.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com