शेतकऱ्यांना मदतच न करणाऱ्यांना आमची मदत तोकडीच वाटणार - सदाभाऊ खोत

शेतकऱ्यांना मदतच न करणाऱ्यांना आमची मदत तोकडीच वाटणार - सदाभाऊ खोत

सांगली -  कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले पाहिजे एवढे समजण्याजोगे हे शहाणे सरकार आहे.आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल याकडे जास्त लक्ष देतो. शेतकऱ्यांना मदतच न करणाऱ्यांना आमची मदत तोकडीच वाटणार, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

कांद्याच्या दरावरून राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. या टीकेला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रत्युत्तर दिले.

या सरकारमध्ये शेतात काम करून आलेली, शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केलेली आमच्यासारखी माणसे काम करत आहेत. आम्हाला शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांच्या शेतीमालाची काळजी आहे. आम्ही बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल याकडे जास्त लक्ष देतो

- सदाभाऊ खोत

दरम्यान,  मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला कांदे फेकून मारा अशी टीका केली आहे तर दुसरीकडे राज्य सरकारनें कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तोकडी आहे अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. 

यावर उत्तर देताना मंत्री खोत म्हणाले, काँग्रेस - राष्ट्रवादीच्या सत्ताकाळमध्ये ५० पैसेपासून एक रुपयापर्यंत मदत दिली गेली होती. आमच्या सरकारने किलोलो दोन रुपये मदत दिली.  म्हणजे त्याच्यापेक्षा आम्ही दुप्पट मदत दिली आहे. गरज भासली तर आणखी मदत देण्याची तयारी राज्य सरकारची आहे. ज्यांनी शेतकऱ्यांना  मदतच दिली नव्हती त्यांना आमच्या सरकारने दिलेली मदत ही तोकडीच वाटणार. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com