सांगोला : सांगोल्यात गेला महिनाभर सतत पडणाऱ्या पावसामुळे बहार धरलेल्या डाळिंब बागांची मोठ्या प्रमाणात फुलगळती होत आहे. सेटिंग झालेल्या बागांवर तेल्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. सततचा पाऊस, कडक ऊन, पहाटे थंड वारा व मध्येच पडणारे धुके अशा लहरी हवामामुळे डाळिंबीवर वाढत्या रोगराईने डाळिंब उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
संकेतस्थळावरून विमा पावत्या ‘डिलीट’
यावर्षी ऑगस्ट बहार धरण्याअगोदर कसलाच पाऊस नसल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ऑगस्ट बहार पाण्याअभावी धरण्यास उशीर झाला. काही शेतकऱ्यांनी शेततळ्याच्या पाण्यावर डाळिंबीचा बहार धरला, परंतु त्यानंतर परतीच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे डाळिंब पिकाला याचा फार मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे सध्या बहार धरलेल्या डाळिंब बागांना मोठ्या प्रमाणात फुलगळती सुरू आहे. फुलगळती सुरू असल्याने शेतकऱ्यांना फक्त वारंवार फवारणी करावी लागत असल्याने डाळिंबीचा येणारा खर्चही वाढत आहे.
शेतकऱ्यांसाठी ‘कम्युनिटी रेडिओ’
सध्या पडणारा पाऊस, दुपारच्या वेळेला पडणारे कडक ऊन, पहाटेचे दव- धुके अशा वातावरणामुळे डाळिंबी वर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. फुलगळती सुरू असून दुसरीकडे सेटिंग झालेल्या बागांवर तेल्याचा रोग वाढल्याने शेतकरी धास्तावला आहे. याचबरोबर मुळकुज, फळकुज, कुजवा, थ्रीप्स तसेच धरलेल्या फळांवर तेल्याचा प्रादुर्भाव झाला आहे.
तब्बल ९ हजार पोलिसांचा आज बंदोबस्त
अशा परिस्थितीत डाळिंब उत्पादकांना एकीकडे पाण्याअभावी बहार धरता आला नाही तर दुसरीकडे सतत पडणाऱ्या पावसामुळे बहार धरूनही विविध रोगांना बळी पडत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी सध्या चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.
बागेचा बहार धरुन दोन महिने झाले तरी पावसाने अध्याप सेटिंग झाले नाही. सतत कळी गळतीमुळे बागेचा खर्च वाढला आहे. खर्च करुनही सेटिंग होईल की नाही अध्याप सांगता येत नाही. डाळिंबाला शासनाने सरसकट नुकसानभरपाई द्यावी
- धनंजय चव्हाण, हलदहिवडी, सांगोला
महाराष्ट्र
|