जिल्ह्यात ‘मनरेगा’तून ३९७४ विहिरी पूर्ण

जिल्ह्यात ‘मनरेगा’तून ३९७४ विहिरी पूर्ण

काशीळ - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करून देऊन त्यांना बारमाही शेती करता यावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेतून जिल्ह्यात आजपर्यंत तीन हजार ९७४ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येणाऱ्या कामांमध्ये सिंचन विहिरींची कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात चार हजार ३८९ सिंचन विहिरी तयार करण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यापैकी तीन हजार ९७४ विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत, तर २५८ विहिरींची कामे प्रगतिपथावर आहेत. तसेच १५७ विहिरींना अजून शासकीय मान्यता मिळालेली नसल्यामुळे अद्यापही कामे सुरू झालेली नाहीत. बागायती शेती करता यावी तसेच हाताला काम मिळावे, यासाठी ही योजना फायदेशीर ठरत आहे. 

दुष्काळी माण, खटाव, कोरेगाव, फलटण या तालुक्‍यांत सर्वाधिक विहिरी काढण्यात आल्या आहेत. या तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने या तालुक्‍यांत विहिरीची संख्याही जास्त आहे. जिल्ह्यात सर्वाधिक खटाव तालुक्‍यात एक हजार १२३, तर महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वांत कमी २३ विहिरींची कामे झाली आहेत. जिल्ह्यात या विहिरींच्या निर्मितीमुळे बागायत क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच पूर्वेकडील तालुक्‍यात विहिरींची संख्या जास्त असल्यामुळे काही प्रमाणात का होईना टंचाई कमी होण्यासही मदत होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com