सांगली ः स्वच्छ भारत अभियान ग्रामीण अंतर्गत घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जिल्ह्यातील 89 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमध्ये स्वच्छता अभियानात विविध उपक्रम राबवले जाणार आहे. त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ही माहिती दिली.
घनकचरा व्यवस्थापनात सार्वजनिक कंपोष्ट पिट निर्मिती, बॅटरीवरील व पायडेलची ट्रॉय सायकल वापरून कचरा गोळा करणे, प्लास्टिक कचरा साठवण्यासाठी शेड बांधणे, कुटुंबासाठी कचरा कुंड्या देणे, सार्वजनिक कचरा कुंड्या बसवणे, कुटुंब स्तरावर कंपोष्ट खत निर्मिती करणे, गाव स्तरीय बायोगॅस प्रकल्प उभारणे, कचरा वर्गीकरण, साठवण व कंपोष्ट प्रकल्प व्यवस्थापन करणे आदी महत्त्वाचे विषय असणार आहेत.
सांडपाणी व्यवस्थापनात सार्वजनिक व कुटुंब स्तरावर शोषखड्डा निर्मिती, स्थिरीकरण तळे, नाले व बंदिस्त गटारी, टाकाऊ प्लास्टिकचा पुनर्वापर करणे आदी विषय असणार आहेत. या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी मिळणार आहे. याशिवाय अन्य उपक्रमातून गावात स्वच्छता नांदावी, यासाठी काम केले जाईल, असे सौ. कोरे यांनी सांगितले.
योजनेतील गावे अशी
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.