शेतकऱ्यांपुढील संकटाची मालिका संपेना
केत्तूर (करमाळा, जि. सोलापूर) - यंदाच्या गळीत हंगामात करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी तसेच मकाई सहकारी व कमलाई शुगर हे साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांची संख्या कमी आहे. त्यातच उजनी पाणलोट परिसरातील उसाला तुरे आल्याने वजनात घटत होऊन नुकसानीत भर पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांपुढील संकाटाची मालिका काही संपेना.
हे ही वाचा... सोलापूर महापालिकेचा मोठा निर्णय... काय तो वाचा
वारंवार बदलणाऱ्या लहरी हवामानाचा फटका अन्य पिकांबरोबरच उसाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. सध्या आलेल्या तुऱ्याने शेतकऱ्यांबरोबरच महाराष्ट्रातील साखर कारखान्यालाही आर्थिक फटका बसत आहे.
यावर्षी परतीच्या पावसाने संततधार हजेरी लावल्याने उसाला तुरा येण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतात पाणी साठल्याने उसाला फटका बसला असून तुऱ्याने वजन घटत आहे. तुरा आलेल्या उसाचे 30 दिवसांत गाळप होत नसल्याने वरचेवर पोकळ होऊन वजन घटत आहे. उजनी पाणलोट परिसरातील तुरा आलेला ऊस तातडीने न तोडल्यास केलेला खर्च वाया जाणार आहे.
हे ही वाचा... आमदार भालके म्हणतात, मी मराठा मोर्चाचा बळी
नगदी पीक असून सध्या तालुक्यातील कारखाने बंद असल्याने ऊसतोड मजुरांची संख्या कमी असल्याने संकटात भर पडली आहे. परिसरातील शेतकरी ऊस बारामती ऍग्रो तसेच अंबालिका शुगर कारखान्यांकडे सध्या पाठवत आहेत. ऊसतोड मजुरांची संख्या कमी असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकूणच शेतकरी संकटात असल्याने हतबल झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे.
पंचनामे करून भरपाई द्यावी
यावर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने उसाला तुरे आले आहेत. तुरा आल्यानंतर उसात धशी पडून वजनात घट होते. तुरा आलेला ऊस कारखान्यांनी प्रथम गाळप करावा तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
- चिंतामणी कानतोडे, केत्तूर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.