दूध संघाने भागवावी तहान - पवार

दूध संघाने भागवावी तहान - पवार

सुपे - सध्याच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी बारामती तालुका दूध संघाने दररोज २५ टॅंकरद्वारे ५० खेपांचे नियोजन करावे, अशी सूचना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. पाऊस पडल्यानंतर हिरवा चारा उगवून येईपर्यंत छावण्या सुरू ठेवण्याबाबत सरकारशी चर्चा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. 

सुपे (ता. बारामती) येथील छावणीवरील शेतकऱ्यांशी ते बोलत होते. दुष्काळ पाहणी दौऱ्यात पवार यांनी बुधवारी सुपे व काळखैरेवाडीच्या छावणीला भेट देऊन पशुपालकांच्या समस्या जाणून घेतल्या. वढाणे गावाला भेट देऊन टंचाई संदर्भातील अडचणी समजून घेतल्या. पिण्याच्या पाण्यासारखे काही प्रश्न सेवाभावी, सहकारी संस्थांच्या माध्यमातून मार्गी लावण्याच्या सूचना केल्या.  

या दौऱ्यात त्यांच्यासमवेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, संभाजी होळकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, विजय पाटील, प्रमोद काळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी होते.

पवार म्हणाले, ‘‘मी केंद्रीय कृषिमंत्री असताना अन्नसुरक्षा कायदा केला. त्याअंतर्गत दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ दिला जात होता. आता अटी घातल्याने अनेक जण धान्यापासून वंचित आहेत. टॅंकरच्या खेपा वाढवण्याची गरज आहे, एका शिधापत्रिकेवर पाचपेक्षा अधिक जनावरे छावणीत दाखल करून गरजेचे आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.’’

उपसा सिंचन योजनेद्वारे नियमित पाणी सोडण्याच्या मागणीवर अजित पवार म्हणाले, ‘‘जनाई योजना दौंड शुगरने, शिरसाई बारामती ॲग्रोने आणि पुरंदर योजना सोमेश्वर कारखान्याने चालवण्यासाठीचा प्रस्ताव सरकारने नाकारला होता. याविषयी पुन्हा प्रयत्न करत आहे. सुपे तलावालगतच्या ४१ शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीज चालू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com