जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध 

जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास शिवसेनेचा विरोध 

राजूर - जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणांतून 5.75 टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा आदेश दिला आहे. त्याचा निषेध करत शिवसेनेचे अकोले तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. त्यात धुमाळ यांनी म्हटले आहे, की अकोले तालुक्‍यात यंदा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला आहे. ऑक्‍टोबरमध्येच तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये टॅंकर सुरू झाले आहेत. येथून "जायकवाडी'ला पाणी सोडल्यास येथील पाण्याच्या गरजेबाबत सरकार काय उपाययोजना करणार. धरण व पुनर्वसन अकोल्यात आहे. उघड्यावर संसार असलेल्या प्रकल्पग्रस्तांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचा भाजप सरकारचा कुटील डाव आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com