महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही - अमोल कोल्हे

Amol-Kolhe
Amol-Kolhe

नगर - महायुती सरकार विकासाची कामे करण्यात अपयशी ठरले आहे. जनतेची सेवा करायची सोडून सरकार यात्रा काढत आहे. महायुतीने महाजनादेश व जनसंवाद, या यात्रा जनतेवर लादल्या आहेत. महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही, अशी टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे केली. 

शासकीय विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत कोल्हे बोलत होते. ते म्हणाले, 'यात्रेत फडणवीस म्हणतात, "मी मुख्यमंत्री'; तर शिवसेनेची जनसंवाद यात्राही "मी मुख्यमंत्री होणार' यासाठीची आहे. राष्ट्रवादीची "शिवस्वराज्य यात्रा' रयतेने मनाने स्वीकारली आहे. ती जनतेच्या कल्याणासाठी आहे. जनताच महायुती सरकारला धडा शिकवेल. मुख्यमंत्र्यांनी मेगा भरती करून रोजगाराची समस्या मिटवू, असे सांगितले. मात्र, तसे होताना दिसत नाही. बहुतांश कंपन्या बंद पडल्या आहेत. राज्य पुराच्या संकटात असताना सत्ताधाऱ्यांना यात्रा काढण्याची गरज काय?'' 

'केंद्र सरकारने 370 कलम रद्द केले. या निर्णयाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध नाही, तर निर्णयाच्या पद्धतीला विरोध आहे,'' असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com