समाजकल्याणचा कारभार ‘रामभरोसे’

State-Government
State-Government

सोलापूर - सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ देणारा व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्कमाफीची रक्‍कम देणारा महत्त्वपूर्ण विभाग असलेल्या समाजकल्याण विभागात नोव्हेंबर २०१५ पासून रिक्‍त पदांची भरतीच झाली नाही. सद्यःस्थितीत तब्बल ४९ टक्‍के पदे रिक्‍त असल्याने ना लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळतोय ना विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळतेय, अशी स्थिती पाहायला मिळत आहे. 

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७२ हजार रिक्‍त पदांच्या मेगा भरतीला चार महिन्यांपासून अद्याप मुहूर्त लागलेला नाही. केंद्र सरकारचे दहा टक्‍के आरक्षण अन्‌ मराठा समाजाचे न्यायालयातील प्रलंबित आरक्षण यामुळे मेगा भरती रखडल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सध्या सोलापूर, पुणे, बीड, यवतमाळ, परभणी, जालना, उस्मानाबाद यासह अन्य दोन जिल्ह्यांना अद्याप पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी; तर १९ जिल्ह्यांमध्ये कार्यालयीन अधीक्षकच नसल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याणविभागात मागील चार वर्षांपासून १९ पैकी नऊ पदे रिक्‍तच आहेत. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय, अशी माहिती सोलापूरचे प्रभारी समाजकल्याण अधिकारी परमेश्‍वर राऊत यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com