'कालव्याला सध्या पाणी पण विद्युत पुरवठा केला बंद'

मोहोळ पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील
मोहोळ पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील

महावितरणच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब

मोहोळ (सोलापूर): भाजपा शासन हे शेतकरी विरोधी असून शेतकरी विरोधी धोरणामुळे तो देशोधडीला लागला आहे. सध्या कालव्याला पाणी सुटले आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केला आहे, त्यामुळे फळबागासह पिके जळू लागली आहेत. याचा जाब विचारण्यासाठी येत्या 26 तारखेस मोहोळ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब व हलगी नाद अंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मोहोळ पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील यांनी दिली.

हल्लाबोल यात्रेच्या वातावरण निर्मीतीसाठी व शेतकरी जागृतीसाठी पाटील पापरी येथे आले होते, त्यावेळी ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे टाकळी सिकंदरचे जि. प. सदस्य शिवाजी सोनवणे सतीश भोसले, उपसरपंच अजीत भोसले, सुलतान मुलाणी, युवराज भोसले आदिसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थीत होते.

पाटील पुढे म्हणाले, सध्या आष्टी उपसा सिंचन व उजनी डाव्या कालव्याला पाणी सुटले आहे. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा बंद केला आहे त्यामुळे पाण्याकडे बघत बसण्याशिवाय शेतकऱ्याना पर्याय नाही. पाण्यामुळे डाळींब बोर द्राक्ष केळी या फळबागा सह मका गहु भुईमुग आदी पिके जळू लागली आहेत. या वेळी पाटील यांना आतापर्यंत तालुक्यातील साठ गावांचा दौरा केला असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगीतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com