राज्यात सत्ताबदलाच्या घडामोडी वेगाने घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेवर विराजमान होतील असा विश्वास आ. समाधान आवताडे यांनी माचणूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मंगळवेढा - राज्यात सत्ताबदलाच्या घडामोडी वेगाने घडत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेवर विराजमान होतील असा विश्वास आ. समाधान आवताडे यांनी माचणूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला व त्यानंतर ते मुंबईला मार्गस्थ झाले.
पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आ. समाधान आवताडे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे राज्यातील नव्या सत्ताबदल आ.अवताडे यांच्या समावेशाच्या निमित्ताने तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या असतानाच त्यांच्याच नेतृत्वाखाली श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत माजी सभापती प्रदीप खांडेकर, उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, संचालक राजेंद्र सुरवसे, राजीव बाबर, राजन पाटील, येताळा भगत, शशिकांत चव्हाण आदी. मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ.आवताडे म्हणाले की, यंदाच्या दामाजीच्या निवडणुकीत विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नाहीत सहा वर्ष कारखाना व्यवस्थित चालवून सभासदांना चांगला दर दिला.
विरोधकाच्या पॅनलमध्ये योग्य समन्वय नाही. एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती आहे. त्यांना साधे योग्य पॅनेल देखील करता आले नाही. मी मनात आणलं असतं तर आणखीन पाच जागा बिनविरोध करू शकलो असतो. परंतु, या प्रकाराने एखाद्या वाद निर्माण झाला असता, परंतु आपण लोकशाही मार्गाने जायचे म्हणून हे सर्व टाळले आहे. विरोधक हा विरोधकच असतो सध्या भालके गटाचे काही कार्यकर्ते आपल्या संपर्कात असून गतवर्षी ज्या-ज्या विरोधकांनी आमची पार्टी पडली यंदा आमचा पॅनल संपुष्टात आणल्याचे त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.