"नांदेड, लातूर, साताऱ्याच्या धर्तीवर  सोलापुरातील मंगल कार्यालये सुरू करा' 

umesh patil
umesh patil

सोलापूर : नांदेड जिल्हाधिकारी, लातूर जिल्हाधिकारी व सातारा जिल्हाधिकारी यांनी लग्न समारंभाच्या संदर्भात शासन आदेशाच्या अधीन राहून त्यांच्या जिल्ह्यातील लग्न समारंभासाठी मंगल कार्यालये वापरण्यास परवानगी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातही त्याच पद्धतीने परवानगी द्यावी, अशी मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील म्हणाले, शासन निर्देशानुसार घरगुती लग्न समारंभास 50 पेक्षा जास्त पाहुणे असू नयेत अशी अट घालण्यात आलेली आहे. याशिवाय सामाजिक अंतर राखणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझरची व्यवस्था करणे, यासह कोरोना संक्रमण होऊ नये याकरिता आवश्‍यक उपाययोजना व खबरदारी घेऊन जास्तीत जास्त 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न समारंभ संपन्न करण्यास परवानगी आहे. तथापि मंगल कार्यालय बंद असल्यामुळे किंवा अद्याप ती सुरू करण्यास परवानगी नसल्यामुळे लग्न समारंभ संबंधितांच्या घरासमोर मांडव टाकून करण्याशिवाय पर्याय नाही. ज्यांच्या घरासमोर पर्याप्त जागा उपलब्ध नाही, त्या ठिकाणी 50 लोकांच्या उपस्थित देखील सामाजिक अंतर राखून समारंभ करणे अडचणीचे ठरत असल्याचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com