Solapur : शेतकऱ्याने तयार केले अनोखे तंत्रज्ञान

डाळिंब पीक लागवडीसाठी ठरणार फायदेशीर : राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचा पुरस्कार
solapur farmer
solapur farmersakal

मोडनिंब : बैरागवाडी (ता. माढा) येथील तरूण शेतकरी प्रविण माने याने आधुनिक डाळिंब लागवड तंत्रज्ञान तयार केले आहे. राज्यातील कमी झालेल्या डाळिंब लागवड क्षेत्रात या तंत्रज्ञानाने नक्कीच वाढ होईल. स्वतःच्या शेतात हे तंत्रज्ञान यशस्वी करून या तरुणाने महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे.

प्रविण एक खोड लागवड तंत्रज्ञान या नावानेच त्यांनी निर्माण केलेल्या या लागवड पद्धतीत ६ एक्स १० फूट अंतरावर एकरी ७५० म्हणजेच पूर्वीच्या लागवड पद्धतीच्या दुप्पट डाळिंब रोपे लागवड केली. झाडातील अंतर कमी केल्याने त्याचा विस्तार उभ्या पद्धतीने वाढविला. झाडाचे मूळ खोड सलग ६ फूट वाढवून नंतर त्याची छाटणी केली. मुख्य खोडाचाच विस्तार वाढल्याने झाडाला अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात.

या सर्वाची दखल घेत नुकताच त्यांना भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांचा प्रगतशील डाळिंब उत्पादक पुरस्कार प्रदान करण्यात आला.: बैरागवाडी (मो) (ता. माढा) येथील तरूण शेतकरी प्रविण माने याने आधुनिक डाळिंब लागवड तंत्रज्ञान तयार केले आहे. राज्यातील कमी झालेल्या डाळिंब लागवड क्षेत्रात या तंत्रज्ञानाने नक्कीच वाढ होईल. स्वतःच्या शेतात हे तंत्रज्ञान यशस्वी करून या तरुणाने महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे.

प्रविण एक खोड लागवड तंत्रज्ञान या नावानेच त्यांनी निर्माण केलेल्या या लागवड पद्धतीत ६ एक्स १० फूट अंतरावर एकरी ७५० म्हणजेच पूर्वीच्या लागवड पद्धतीच्या दुप्पट डाळिंब रोपे लागवड केली. झाडातील अंतर कमी केल्याने त्याचा विस्तार उभ्या पद्धतीने वाढविला. झाडाचे मूळ खोड सलग ६ फूट वाढवून नंतर त्याची छाटणी केली. मुख्य खोडाचाच विस्तार वाढल्याने झाडाला अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात.

या सर्वाची दखल घेत नुकताच त्यांना भारतीय कृषी संशोधन परिषद नवी दिल्ली व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांचा प्रगतशील डाळिंब उत्पादक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शेतकऱ्यांनी हे नवीन लागवड तंत्रज्ञान वापरले तर उत्पादन खर्चात ५० टक्के बचत होते. वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे डाळिंब बागांचे क्षेत्र कमी झाले आहे. खोडकीड, बुरशी, मर आदी रोगांना या बागा बळी पडल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे या रोगांना आळा बसून हमखास बहार बसू शकतो.

- प्रवीण माने, बैरागवाडी, माढा

कृषी विद्यापीठाने पहिले किमान १८ महिने बहार धरू नये, असे सुचविले आहे. परंतु श्री. माने यांनी पहिल्या तीन वर्षात दोन पीके घेवून एकरी १० टन डाळिंब काढता येते हे दाखवून दिले. त्यांनी एक खोड पद्धत वापरून प्लास्टिक मल्चिंगचा वापर करून झाडांचा मर रोगापासूनही बचाव केला आहे.

-रविंद्र कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी, कुर्डुवाडी

दुष्काळी भागात डाळिंबाने क्रांती केली. परंतु मागील दोन तीन वर्षांपासून डाळिंब पिकाला मोठी घरघर लागली आहे. अवघड परिस्थितीत व बदलत्या वातावरणात किड रोगाचा प्रादुर्भाव सतत होत असतो. परंतु प्रविण माने यांनी आपल्या स्वतःच्या तंत्रज्ञानाने सलग उत्पादन घेऊन या सर्वांवर मात केली आहे.

- लक्ष्मण खताळ, तालुका कृषी अधिकारी, शिरूर अनंतपाळ, लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com