सोलापूर : भविष्यातील उष्माघाताच्या बळीला कोण जबाबदार?

जिल्हा परिषद शाळांच्या वेळेबाबत फेरविचाराची गरज
 zp schools
zp schoolssakal

सोलापूरचा उल्लेख नेहमीच सोलापूर असा केला जातो, त्यामागे कारणही तसेच आहे. चेष्टेने सोलापूरला दोनच मौसम असल्याचे सांगितले जाते, एक म्हणजे तीव्र उन्हाळा अन्‌ दुसरा कमी उन्हाळा. पावसाळा व हिवाळा हे ऋतू या सोलापुरात असून नसल्यासारखेच! हे सारे इथं सांगण्याचा खटाटोप इतक्यासाठीच, की जिल्हा परिषदेने ऐन उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्यातील शाळा सकाळी सात ते दुपारी साडेबारा या वेळेत ठेवल्या आहेत. या संदर्भात समाज माध्यमांवर मोठी चर्चा होऊ लागली आहे. दुपारी साडेबाराला संपलेल्या शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा काही विचार होणार की नाही? वाढत्या उन्हाचा प्रचंड तडाखा आणि त्यात जिल्हा परिषदेच्या पत्र्यांच्या शाळा.हा कहरच होईल, असे वाटते. यातून उष्माघाताने काही अघटित घडले तर कोण जबाबदार?

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या कहरामुळे शिक्षणाचे तीन-तेराच झाले आहेत. या कालावधीत ऑनलाइन अभ्यासक्रम झाला, पण त्यावर वेगवेगळ्या चर्चा होतील. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल नव्हता. ज्यांच्याकडे होता, त्यांना रेंज मिळत होती का? तो रिचार्ज करण्याची पालकांची क्षमता होती का? त्या खेड्यातील मोबाईलच्या चार्जिंगचे काय? असे एक ना अनेक प्रश्‍न या कालावधीत उपस्थित झाले होते. त्यावरही मात करीत काही प्रमाणात का होईना ऑनलाइन शिक्षणाला सुरवात झाली असेच म्हणावे लागेल. कोरोनाच्या उद्रेकामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळाच माहिती नाही तर काही विद्यार्थ्यांची लिखाणाची सवयच मोडली गेली. कोरोनाकाळात बुडालेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेने मे महिन्यात म्हणजे दरवर्षीच्या सुट्टीच्या कालावधीत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलांचा पाया पक्का व्हावा, त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यात खंड पडू नये हे सगळं जरी एकीकडे बरोबर असले तरी सोलापूरच्या ऐन मे महिन्याच्या अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात दुपारी साडेबारापर्यंतची वेळ कितपत योग्य राहील, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सोलापूरच्या तापमापीच्या पाऱ्याने सध्या तरी ४२ अंशापर्यंत मजल मारली आहे. आगामी काळात आणखी एक-दोन अंशाने तो वाढेलच यात काही शंका नाही. भरदुपारी शाळा सुटण्याची साडेबाराची वेळ पाहता ती कोणासाठीही योग्य ठरेल असे नाही. सध्या सकाळी दहानंतर दुपारचेच वातावरण असते. त्यानंतर उन्हाचा तडाखा वाढतो. दुपारी साडेबारापर्यंतचा विचार करता त्याची तीव्रता कशी असेल हे जाणवू लागले आहेच. शहरातील बड्यांच्या शाळा, तेथील वर्ग याचा विचार करता तसेच त्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बस, पालकांच्या चारचाकी गाड्या हे सगळे पाहता फार अडचणीचे आहे असे वाटत नाही. परंतु जिल्हा परिषद शाळांचे चित्र फारच विदारक आहे. अनेक शाळा पत्र्याच्या शेडमध्ये चालतात, असे चित्र आहे. काही ठिकाणी तर झाडेच नाहीत. तेथील विद्यार्थी व शिक्षकांची पराकोटीची कसोटी लागेल हे निश्‍चित! साडेबाराच्या सुमारास खेड्यातील वातावरण पाहता उन्हाच्या कडाक्याने गावे सुनसान पडलेली दिसत आहेत. उष्णतेने गाठलेल्या उच्चांकाचा विचार तर करावाच लागणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याचा फेरविचार करण्याची गरज आहे.

वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांचेही कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी काही राज्यांनी

एक नजर...

  • जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा :२७९७

  • सोलापूर शहर हद्दवाढ भागातील शाळा :३७

  • जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी :२०१४२४

  • जिल्हा परिषदेचे शिक्षक :९७२०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com