सोलापूर : दोन्ही डोस न घेतलेल्यांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका

पावणेसहा लाख व्यक्‍ती अद्याप लसीकरणापासून दूर; प्रशासन चिंतेत
Corona Vaccine
Corona Vaccinesakal

सोलापूर : कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण(vaccination) सुरु होऊन १६ जानेवारीला वर्ष पूर्ण होत आहे. तरीही, जिल्ह्यातील पाच लाख ७३ हजार ३८६ व्यक्‍तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. त्यात शहरातील एक लाख १२ हजार तर ग्रामीणमधील पावणेपाच लाख व्यक्‍ती आहेत. अडीच लाख व्यक्‍तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. लस न घेतलेल्यांनाच कोरोना(corona), ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका असून त्यांच्यात विषाणूची (omicron)तीव्रता अधिक असल्याची चिंता सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्‍त केली आहे

Corona Vaccine
वडिलांचं 'ते' वाक्‍यच ठरलं टर्निंग पॉइंट! अन्‌ घेतली यशस्वी झेप!

कोरोनाची तिसरी लाट(corona third wave) सुरु झाली असून दुसरीकडे ओमिक्रॉनचा संसर्गही वाढू लागला आहे. मुंबई, पुण्यातील शाळा बंदचा निर्णय यापूर्वीच झाला असून राज्यात काही प्रमाणात निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. तरीही, संसर्ग कमी झाला नसून सध्या बाधित होणाऱ्यांमध्ये लस न टोचलेलेच सर्वाधिक आहेत. त्यांच्यातील विषाणूची तीव्रताही अधिक जाणवू लागली आहे. दोन्ही डोस टोचलेल्यांना केवळ साधा ताप, सर्दी, खोकला असल्याची बाब समोर आली आहे. तरीही, राज्यातील तब्बल एक कोटी व्यक्‍ती पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी आलेच नाहीत. दुसरीकडे १५ ते १८ वयोगटातील ६० लाख मुलांना कोवॅक्‍सिन लस टोचणे अपेक्षित असून त्यात सोलापूर शहर-ग्रामीणमधील अडीच लाख मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत दहा हजार मुलांनीदेखील लस टोचलेली नाही. दरम्यान, ज्या व्यक्‍तींना लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले, त्यांनी त्याच लसीचा बुस्टर डोस घ्यावा, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

स्थानिक प्रशासनाच्या हाती शाळा बंदचा निर्णय

राज्यात कोरोनाचे दररोज सरासरी ३२ हजारांवर रुग्ण आढळू लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आता संसर्ग वाढत असल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली आहे. राज्यस्तरावर शाळा बंदचा निर्णय होईल, याची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. परंतु, स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्‍त शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले.

Corona Vaccine
प्रयोगशील शिक्षकांचे प्रतिकूल परिस्थितीतही अतुलनीय योगदान!

कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी संबंधितांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचून घेणे आवश्‍यक आहे. ज्यांनी लस टोचलेली नाही, त्यांच्यात विषाणूची तीव्रता अधिक आहे. रुग्णालयात जाणाऱ्या नातेवाईकांनी दोन्ही डोस घेतलेले असावेत. कोरोना रुग्णासोबत कोणालाच प्रवेश दिला जाणार नाही.

- डॉ. दिलीप म्हैसकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com