उजनीतून शेतीसाठी आज सुटणार पाणी। महिनाभर राहणार कालवे तुडुंब

मंगळवारपासून (ता. ५) उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. कडक उन्हामुळे माना टाकत असलेल्या शेतीपिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
ujani dam
ujani damesakal

सोलापूर : उजनी धरणात सध्या ३४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. मंगळवारपासून (ता. ५) उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. कडक उन्हामुळे माना टाकत असलेल्या शेतीपिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

ujani dam
फडणवीस म्हणाले, ठाकरे सरकारला शेतकऱ्यांनी चिंता कमी बेवड्यांची जास्त

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढले. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांची मोठी वाढ झाली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर- जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते. पण, आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत. कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे. सोलापूर, नगर, पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरले आहे. धरणात सध्या ९७.७२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा ३४.०६ टीएमसी एवढा आहे. दरम्यान, धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून, पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून ते आवर्तन सोडले जाईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

ujani dam
देशमुखांसह दोन सचिव अन् वाझे केंद्राच्या ताब्यात, CBIचे पथक कारागृहात दाखल

धरणात १४ टीएमसी गाळ
उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ११४ टीएमसी एवढी आहे. बारामतीतील उद्योगांसह नगर, पुणे व सोलापूर जिल्ह्यासाठी धरणातून पाणी सोडले जाते. दरवर्षी पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले जाते. काहीवेळा धरण मायनसमध्येही जाते. सध्या धरणात तब्बल १४ टीएमसी गाळ साचला आहे. गाळ काढण्यासंदर्भात मागे निर्णय झाला, पण तो मक्ता रद्दही झाला. आता शासन स्तरावरून राज्यातील सर्वच धरणांतील गाळ काढण्यासंदर्भात स्वतंत्र धोरण ठरत आहे. त्यानंतर गाळ काढण्याच्या कामाला मुहूर्त लागणार आहे.

ujani dam
मंत्री नवाब मलिकांना मोठा दणका; न्यायालयीन कोठडीत वाढ

तीन हजार 200 क्युसेकने सोडले जाणार पाणी

उजनीतून शेतीसाठी मंगळवारपासून पाणी सोडले जाणार आहे. डावा व उजव्या कालव्यातून हे पाणी सोडले जाणार असून हे आवर्तन महिनाभर सुरू राहील. टप्प्याटप्प्याने जवळपास तीन हजार 200 क्युसेकने हे पाणी सोडले जाणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

ujani dam
तुरुंगात अनिल देशमुख पडले; होणार शस्त्रक्रिया, जे जे रुग्णालयात दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com