साखर कारखानदारीही टिकायला हवी : सहकारमंत्री देशमुख 

साखर कारखानदारीही टिकायला हवी : सहकारमंत्री देशमुख 

सोलापूर : गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास सरकार आणि साखर कारखाने बांधिल आहेत. एफआरपीच्यावर कोणत्या कारखान्याने किती रक्कम द्यावी ही सरकारची जबाबदारी नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा मोबदला मिळाला पाहिजे. हा मोबदला मिळत असताना साखर उद्योगही टिकला पाहिजे अशी भूमिका राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.

दिवाळी फराळनिमित्त सोलापुरातील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या वार्तालापमध्ये ते बोलत होते. सहकारमंत्री देशमुख म्हणाले, शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत चर्चा केली. सिद्धेश्‍वर व मातोश्री या साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम न देताच यंदाच्या गळीत हंगामाला सुरवात केल्याचा मुद्दा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला. या दोन्ही कारखान्यांच्या गतवर्षीच्या एफआरपीचा प्रश्‍न लवकरच सुटणार असल्याचेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.

ज्या कारखान्यांनी गाळप परवान्याशिवाय कारखाने सुरू केले आहेत त्याची माहिती आपण संकलित करत असल्याचेही त्यांनी सांगितले. यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या उसापोटी पहिल्या एकरक्कमी हफ्त्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. गुजरातमध्ये शेतकऱ्यांना टप्प्या टप्प्याने एफआरपी वितरित केली जाते. त्या पद्धतीने आपल्याकडेही टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्याची पध्दत सुरू करावी अशी मागणीही कारखानदारांची असल्याचे सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com