कोल्हापुरात दहा ऑक्‍टोबरला ऊस परिषद

कोल्हापुरात दहा ऑक्‍टोबरला ऊस परिषद

सांगली - सरकार एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. एफआरपी एक रकमीच मिळाली पाहिजे. यासाठी, १० ऑक्‍टोबरला कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे ऊस परिषद घेणार आहे. यामध्ये भूजल कायदा, वीज दर आकारणीबाबत आवाज उठवला जाईल, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे दिला.

ते म्हणाले,‘‘केंद्र सरकार एफआरपीचे तुकडे करत आहे. सध्याची एफआरपी चौदा दिवसांत देण्याचा कायदा असतानाही त्याचे दोन ते तीन तुकडे केले जातात,  कायदा मोडला जातो. असे असताना आताही विरोधकांतील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या ताब्यातील भाऊराव चव्हाण साखर कारखाना, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पद्मश्री विखे-पाटील कारखान्यांसह सात साखर कारखान्यांनी उच्च न्यायालयात एफआरपीचे तुकडे करण्यास म्हणजेच कायदा मोडण्यास परवानगी मागितली आहे. एफआरपीची रक्कम दोन टप्प्यांत देण्याची मागणी केली जात आहे. हा निर्णय पूर्ण चुकीचा आहे. याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, पाणी उपशावर भूजल कायदा करून शेतकऱ्यांची लूट केली जाणार  आहे. शेतकऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. त्यामुळे या सर्व मुद्द्यांवर आवाज उठविला जाणार आहे.’’

पहिला हप्ता ३५०० ने पाहिजेच
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले,‘‘यंदा गाळपास जाणाऱ्या उसाला ३५०० रुपये पहिला हप्ता मिळाला पाहिजे. सरसकट शेतकऱ्यांची कर्जातून आणि वीजबिलातून मुक्ती झाली पाहिजे. दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट काढून टाका आदी महत्त्वपूर्ण मागण्या या परिषदेत केल्या जातील.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com