बेदाणा विक्रीनंतर शेतकऱ्यांना २१ दिवसांत मिळावेत पैसे

बेदाणा विक्रीनंतर शेतकऱ्यांना २१ दिवसांत मिळावेत पैसे

तासगाव - द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले.

दरवर्षी द्राक्ष हंगाम सुरू झाला, की शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक ठरलेली असते. त्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने द्राक्ष दलालांना ओळखपत्रे द्यावीत. त्याशिवाय बेदाणा सौद्यावेळी धरली जाणारी बेदाणा तूट ५०० ग्रॅम धरावी, बेदाणा विक्री झाल्यावर शेतकऱ्यांना २१ दिवसांत पैसे मिळावेत या व अन्य मागण्यांसाठी तासगाव बाजार समितीवर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मोर्चातर्फे शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आलेले निवेदन बाजार समितीचे सभापती ॲड. जयसिंग जमदाडे यांनी स्वीकारले. त्यावेळी बाजार समितीचे उपसभापती दिनकर पाटील, संचालक रवींद्र पाटील, कुमार शेटे, लक्ष्मण पाटील, सचिव चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.

श्री. खराडे यांनी बेदाणा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक न थांबल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, बेदाण्याची धरली जाणारी तूट कमी व्हावी व वेळेवर पैसे मिळाले पाहिजेत, अशी मागणी केली.गुलाबराव यादव,  संजय बेले, पोपट मोरे यांचीही भाषणे झाली. 

वर्षभरात २५ कोटींचे नुकसान
बेदाण्याचा सौदा होत असताना अर्धा किलोची तूट होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असते, ही एक बाजू आहे. मात्र दुसरी बाजू फार महत्त्वाची आहे. या सर्वांपेक्षा दलालांकडून होणारे नुकसान फार मोठे आहे. यासाठीच द्राक्ष दलालांना ओळखपत्र मिळावे, अशी मागणी आता केली आहे. ती अत्यंत महत्त्वाची असून गेल्यावर्षी या दलालांकडून फसवणुकीतून शेतकऱ्यांचे २५ कोटींचे नुकसान झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com