कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेट्टी बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने आणि महापूराने मोठे नूकसान झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 75 हजार हेक्टरवरील ऊस कुजला आहे. याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र दोन वर्षापूर्वी जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. शासनाच्या भूलथापांना आता बळी पडणार नाही. वास्तविक एवढा मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असताना शासनाने आणि प्रशासनाला काहीही समजले नाही, हे दुदैवी आहे. एक ऑगस्टमध्ये धरणे रिकामी केली असती तर पुर परिस्थिती ओढवली नसती. असेही श्रीे शेट्टी यांनी सांगितले.
स्वाभिमानी संघटनेने केलेल्या मागण्या अशा -
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.