सातारा : "अष्टपुत्र भव...' असा एकेकाळचा आशीर्वाद आज जर कोणी दिला, तर त्या व्यक्तीकडे आश्चर्याने पाहिले जाते. बदलत्या काळात कुटुंब नियोजनाला महत्त्व आले आहे. शैक्षणिकदृष्ट्या साक्षर झालेल्या साताऱ्यात गत आर्थिक वर्षात तब्बल 17 हजार 303 दापंत्यांनी एका अपत्यावरच थांबणे पसंत केले आहे.
भारतीय समाज हा बहुपुत्र संस्कृतीतून पुढे आला आहे. घरात भावंडांची संख्याही खूप असायची. त्यामुळे बहिणी, भावंडे मिळून काही कुटुंबांनी दोन आकडी संख्याही गाठलेली असते. सध्याही अशी अनेक कुटुंबे पाहण्यास मिळत आहेत. मात्र, बदलत्या आर्थिक, शैक्षणिक, भौतिक परिस्थितीमुळे ही स्थिती झपाट्याने बदलली आहे. "मुलगी झाली होय...' पहिल्याच प्रसूतीला असे शब्द कानावर पडले, की नाक मुरडले जात असे. "दुसरीपण मुलगीच' हे ऐकले तर त्या मातेला आयुष्यभर त्रास सोसावा लागे. समाजात त्या कुटुंबाची मान खाली जाई... परंतु, हे आता मागे पडत चालले आहे. वंशाला दिवा म्हणजे मुलगा हवाच, ही विचारधाराही बदलत आहे. ही बदलती परिस्थिती म्हणजे युवा पिढीचे, समाजाचे सकारात्मकतेकडे पडलेले पाऊलच आहे.
एका अपत्यावर थांबलेल्या जोडप्यांची संख्या (2017-18)
सातारा : 3126
पाटण : 2355
फलटण : 2302
खटाव : 2017
माण : 1671
कऱ्हाड : 1407
कोरेगाव : 1316
खंडाळा : 915
वाई : 819
जावळी : 789
महाबळेश्वर : 586
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.